अरुणाचल प्रदेश
भारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य / From Wikipedia, the free encyclopedia
अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे.[1] हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.[2] या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते.
जलद तथ्य
?अरुणाचल प्रदेश भारत | |
— राज्य — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ८३,७४३ चौ. किमी |
राजधानी | इटानगर |
मोठे शहर | इटानगर |
जिल्हे | १७ |
लोकसंख्या • घनता |
१३,८२,६११ (२६ वे) (इ.स. २०११) • १७/किमी२ |
भाषा | इंग्रजी, हिंदी |
राज्यपाल | बी डी मिश्रा |
मुख्यमंत्री | प्रेमा खंडु |
स्थापित | २० फेब्रुवारी १९८७ |
विधानसभा (जागा) | Unicameral (60) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-AR |
संकेतस्थळ: अरुणाचल प्रदेश संकेतस्थळ |
बंद करा
इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.[3] अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.[4]