१९८८ आशिया चषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८८ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ३री स्पर्धा बांगलादेशमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर १९८८ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. बांगलादेशात प्रथमच लिस्ट-अ सामने स्वरूपाची स्पर्धा खेळवली जात होती. तेव्हा बांगलादेश आयसीसीचा पूर्ण सदस्य नव्हता. सर्व सामने ढाक्यातील बंगबंधू नॅशनल स्टेडियमवर खेळविण्यात आले.
जलद तथ्य १९८८ आशिया चषक, तारीख ...
१९८८ आशिया चषक | |||
---|---|---|---|
तारीख | २७ ऑक्टोबर – ४ नोव्हेंबर १९८८ | ||
व्यवस्थापक | आशिया क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी आणि अंतिम सामना | ||
यजमान | बांगलादेश | ||
विजेते | भारत (२ वेळा) | ||
सहभाग | ४ | ||
सामने | ७ | ||
मालिकावीर | नवज्योतसिंग सिद्धू | ||
सर्वात जास्त धावा | इजाझ अहमद (१९२) | ||
सर्वात जास्त बळी | अर्शद अय्युब (९) | ||
|
बंद करा
स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. भारताच्या नवज्योतसिंग सिद्धूला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.