उच्च माध्यमिक शिक्षण
From Wikipedia, the free encyclopedia
Buldna
परीक्षेला बसलेल्या 12 लाख 81 हजार 157 पैकी 9 लाख 24 हजार 599 विद्यार्थी (72.17 टक्के) उत्तीर्ण झाले.
शाखेनुसार निकाल
शाखा | विद्यार्थ्यांची संख्या | उत्तीर्ण | टक्केवारी |
---|---|---|---|
विज्ञान | 3,46,644 | 2,97,436 | 85.80 |
कला | 4,61,087 | 3,27,843 | 71.10 |
वाणिज्य | 2,84,279 | 2,01,919 | 71.03 |
एमसीव्हीसी | 54,889 | 48,603 | 88.55 |
विषयानुसार उत्तीर्णांची टक्केवारी
मराठी-- 95.60 हिंदी--94.41 इंग्रजी-- 83 गणित (विज्ञान शाखा)--86 गणित (वाणिज्य शाखा)--92 भौतिकशास्त्र—86 रसायनशास्त्र—87 जीवशास्त्र—88 तत्त्वज्ञान--69 तर्कशास्त्र—63 वाणिज्य संघटन—74 चिटणिसाची कार्यपद्धती--74 सहकार--81
राज्यभरात २०११परिक्षेस तेरा लाख २५ हजार ९३६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी तेरा लाख आठ हजार २७२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी आठ लाख ५८ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच निकालाची एकूण टक्केवारी ६५.६१ टक्के आहे. बारावीला सहा लाख ५६ हजार ७२५ मुले, तर पाच लाख दोन हजार ६३४ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी अनुक्रमे चार लाख ३५ हजार ९९९ आणि तीन लाख ८३ हजार ५०३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून ते ७६.३० टक्के आहे. तर २०११परिक्षेस ६६.३९ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. पुनर्परीक्षार्थीचा निकाल २६.१४ टक्के लागला आहे. २०११परिक्षेस बारावीला १ लाख ४८ हजार ९०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३८ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. बारावीच्या निकालात २०११परिक्षेस एमसीव्हीसी विषयात ८२.५६ टक्के विद्यार्थी, तर विज्ञान शाखेत ८१.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला ६०.१६ टक्के, वाणिज्य ७१.१० टक्के निकाल लागला.[1]
इ.११वी व १२वी उच्य माध्यमिक स्तर आसतो. इ.११ वीची परिक्षा शालेय स्तरावर घेतली जाते .इ.१२वीची परीक्षा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेते.