चंद्रपूर
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर. / From Wikipedia, the free encyclopedia
चंद्रपूर (आधीचे रूढ नाव चांदा) हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात शंकराचे (अंचलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत. चंद्रपूरपट्टा खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रपूरची लोकसंख्या ३,७३,००० इतकी होती आहे. या गावापासून जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.
चंद्रापूर याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य
?चंद्रपूर महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: चांदा | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | चंद्रपूर |
तालुका/के | नागभिड, राजुरा, जिवती, कोरपना, भद्रावती, सावली, पोंभुर्णा, ब्रम्हपुरी, वरोरा, मुल, चिमूर, बल्लारपूर, सिंदेवाही, चंद्रपूर |
लोकसंख्या | ३,७३,००० (२०११) |
पालकमंत्री | विजय वडेट्टीवार |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४४२४०१ • +९१७१७२ • MH 34 |
बंद करा
हा लेख चंद्रपूर शहराविषयी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह ह्याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली. चंद्रपूर हे त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती. यास पूर्वी चांदागढ म्हणून नाव होते. त्याला चांदाही म्हणत असत.११ जानेवारी १९६४ रोजी महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एन.एम.सी./१०६३ हा निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार याचे नाव चांदावरून चंद्रपूर असे करण्यात आले.[1]