महिपती ताहराबादकर
एक संतकवी / From Wikipedia, the free encyclopedia
संत महिपती (मराठी लेखनभेद: महिपती ताहराबादकर) (अंदाजे शा.श. १६३७ / इ.स. १७१५ - श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ / इ.स. १७९०) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते. त्यांनी १३व्या ते १७व्या शतकादरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संताबाबतचे चरित्रलेखन केले.[1] [2] [3]