सुधीर नरहर रसाळ
From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६ पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. रसाळ हे सन १९९० ते १९९३ या काळात औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख होते.[1]