१९८४ आशिया चषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८४ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही प्रथम स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये एप्रिल १९८४ मध्ये झाली. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या आशिया खंडातील ३ कसोटी खेळणाऱ्या देशांनी सहभाग घेतला. सर्व सामने शारजाहमधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले. या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला होता.
जलद तथ्य १९८४ आशिया चषक, तारीख ...
१९८४ आशिया चषक | |||
---|---|---|---|
तारीख | ६ – १३ एप्रिल १९८४ | ||
व्यवस्थापक | आशिया क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी | ||
यजमान |
![]() | ||
विजेते |
![]() | ||
सहभाग | ३ | ||
सामने | ३ | ||
मालिकावीर |
![]() | ||
सर्वात जास्त धावा |
![]() | ||
सर्वात जास्त बळी |
![]() | ||
|
बंद करा
स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी भारताने दोनी सामने जिंकत पहिल्या आशिया चषकावर नाव कोरले तर श्रीलंका १ विजय आणि १ पराभवासह दुसऱ्या स्थानावर (उपविजेता) राहिला. पाकिस्तानला एकही सामना जिंकण्यात यश आले नाही. भारताच्या सुरिंदर खन्नाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.