नाथ संप्रदाय
शैव धर्मातील योग परंपरा / From Wikipedia, the free encyclopedia
नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. "नाथ" या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला "नाथ संप्रदाय" असे नाव मिळाले, असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर "नाथ" हा शब्द जोडता येतो.
नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली, आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला.
नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सुमारे ८व्या ते १२वे शतकात) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. नवव्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारूपाला आणले.
नवनाथ ब्रम्हाच्या विर्यापासून उत्पन्न झाले म्हणून समस्त नाथसंप्रदाय नाथपंथी नाथसमाज हिंदू वर्ण व्यवस्था मधे मोडला जात नाही. व ब्रम्हाच्या द्वारे त्यांना देह प्राप्त झाला व त्या देहात नवनारायण यांनी प्रवेश केला. श्री दत्तगुरू यांनी नवनाथाना नाथसंप्रदाय मध्ये त्यांना महत्वपूर्ण स्थान दिले.
गुरू मच्छिंद्रनाथाना संजीवनी मंत्राची दीक्षा प्राप्त आहे. दैत्यगुरू शुक्राचार्य यांना प्रसन्न करून त्यांच्या कडून गुरू मच्छिंद्रनाथानी संजीवनी मंत्राची दीक्षा मिळवून घेतली. व नंतर ही दीक्षा गुरू गोरक्षनाथाना देण्यात आली. चुकीचा वापर होऊ नये म्हणून संजीवनी मंत्राची दीक्षा नाथानी गुप्त स्वरूपात ठेवली. नाथसंप्रदाय मध्ये गृहस्थ जीवन पद्धती सुरू करण्यासाठी गुरू गोरक्षनाथानी स्त्री व पुरुष यांची मातीचे पुतळे निर्माण करून त्यात संजीवनी मंत्र व महा मृत्युंजय मंत्रांनी मातीचे पुतळ्यात जीव निर्माण केला. त्यांनंतर अनेक स्त्री व पुरुष निर्माण करून त्यांचे विवाह करून त्यांना (सामाजिक बांधिलकी, प्रेम, त्याग, भक्ती, काम, भोग, मोक्ष) गृहस्थ जीवनाचा सुलभ व सुखी जीवनाचा मार्ग दाखविला. नाथसंप्रदायची नाथपंथी नाथसमाज सुरुवात झाली. नाथसंप्रदाय हा भारतातील एक हिंदू धार्मिक नाथ समाज आहे.
'नाथसंप्रदाय मधले मुख्य दैवत
श्री शिवशक्ती - महादेव व आदिशक्ती व श्रीहरि विष्णू नारायण आणि श्री दत्तगुरू व श्री हरी विष्णू नारायण नवनाथ (नवनारायण) आणि वैष्णोवी देवी धाम येथील भैरवनाथ हे नवनाथ यांचे अग्रज मानले जातात.
नाथ संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही भूमिका.. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत एकमत नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. नाथ संप्रदाय वर्णव्यवस्थेला मानत नाही. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरूपात संबंध आलेला दिसतो. बौद्ध धर्माच्या भारतातील शेवटच्या काळात महायान पंथात तांत्रिक कर्मकांड रूढ झाले होते. त्याचाच वारसा नाथ संप्रदायाने पुढे चालवला असे म्हणता येईल. या संप्रदायाच्या रूपनाथ येथील मंदिराशेजारी सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे.