कबीर पंथ

From Wikipedia, the free encyclopedia

कबीर पंथ
Remove ads

कबीर पंथ भारताच्या भक्तीकाळातील कवी संत कबीर यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे.[] कबीर पंथ हा संत कबीर यांनी सुरू केलेला भक्तीचा मार्ग आहे. कबीर पंथ कबीर यांना त्यांच्या मुख्य गुरू किंवा खऱ्या परमेश्वराचे अवतार मानतो.[] कबीरांचे शिष्य धर्मदास ह्यांचे पुत्र चुडामणी ह्यांच्यापासून प्रथम कबीर पंथाची सुरुवात झाली. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला.[] कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत.[] कबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.[]

Thumb
संत कबीर
Remove ads

पार्श्वभूमी

सध्याचा सर्वात नवीनतम आणि महत्त्वाचा पंथ म्हणजे तेरावा पंथ. संत कबीरांनी दिलेल्या शिकवणुकीचे पालन करणारे ते थेट वंशज आहेत असे म्हणता येईल. हा सोडून इतर बारा पंथ होऊंन गेले, ज्यांना कबीर सागरमध्ये "काळाचे पंथ" म्हंटले आहे.

बारा नकली पंथ

कबीर साहेबांच्या नावाने काळाने बारा नकली पंथ सुरू केले असे म्हंटले जाते. त्यांचा उद्देश, कबीर साहेबांच्या नावाने जगात चुकीच्या पूजा पद्धतीचा प्रचार करावा, ज्यामुळे मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकणार नाही आणि चुकीच्या साधनेतच गुंतलेला राहील, असा असेल.

द्वादश पंथ काल फुरमाना। भूले जीव न जाय ठिकाना।।[]

ह्या बारा पंथांचे विवरण कबीर सागर ग्रंथात पुढीलप्रमाणे आहे:

  1. नारायण दास पंथ (हा चूडामणींचा पंथ आहे कारण धर्मदासांचे पहिले पुत्र नारायण दास ह्यांनी तर कबीर पंथ स्वीकारलाच नव्हता)
  2. यागौदास (जागू) पंथ
  3. सूरत गोपाल पंथ
  4. मूल निरंजन पंथ
  5. टकसार पंथ
  6. भगवान दास (ब्रह्म) पंथ
  7. सत्यनामी पंथ
  8. कमाली (कमाल चा) पंथ
  9. राम कबीर पंथ
  10. प्रेम धाम (परम धाम) ची वाणी पंथ
  11. जीवा पंथ
  12. गरीबदास पंथ[]

उपरोक्त बारा पंथांचे अनुयायी कबीरांच्या महिमेचे गुणगान करतील व त्यांच्या वाणीने जीवांना समजवतील. परंतु वास्तविक मंत्राच्या अपरिचिततेमुळे साधक असंख्य जन्म सतलोकात जाऊ शकणार नाहीत. ते कबीरांचीच भक्ती करतील परंतु स्थायी स्थान (सतलोक) प्राप्त करू शकत नाहीत:

साखी हमारी ले जीव समझावै, असंख्य जन्म ठौर नहीं पावै।।

बारवें पंथ प्रगट ह्नै बानी, शब्द हमारे की निर्णय ठानी।।

अस्थिर घर का मरम न पावैं, ये बारा पंथ हमही को ध्यावैं।

बाराव्या पंथामध्ये (गरीबदास पंथ) पुढे जाऊन स्वतः कबीर साहेब येतील आणि सर्व बारा पंथांचे निरसन करून एकच पंथ चालवतील:

बारवें पंथ हम ही चलि आवैं, सब पंथ मेटि एक ही पंथ चलावें।।

तोपर्यंत सारशब्द आणि सारज्ञान (तत्त्वज्ञान) लपवून ठेवायचे निर्देश दिले आहे:

धर्मदास मोरी लाख दुहाई, मूल (सार) शब्द बाहर नहीं जाई।

मूल (सार) ज्ञान बाहर जो परही, बिचली पीढी हंस नहीं तरहीं।

तेतिस अर्ब ज्ञान हम भाखा, तत्वज्ञान गुप्त हम राखा।

मूलज्ञान (तत्वज्ञान) तब तक छुपाई, जब लग द्वादश पंथ न मिट जाई।[]

तेरावा पंथ

पुढे असे म्हंटले आहे कि तेरावा वंश (अंश) पूर्णपणे अज्ञानाचा अंधार समाप्त करून परमेश्वर कबीरांची वास्तविक महिमा आणि नावाचे ज्ञान करून देईल:

बारहवें वंश प्रकट होय उजियारा,

तेरहवें वंश मिटे सकल अंधियारा[]

ह्याचे प्रमाण संत गरीबदास जी महाराज यांनी त्यांच्या अमृतवाणी मध्येही दिले आहे:

सतगुरू दिल्ली मण्डल आयसी, सूती धरती सूम जगायसी[१०]

असे म्हणतात कि आज १३व्या पंथात संत रामपाल जी महाराजांनी कबीर साहेबांचा तेरावा वास्तविक मार्ग म्हणजेच यथार्थ कबीर पंथ चालवला आहे.[११]

साहित्य

कबीर पंथाविषयी विस्तृत माहिती अनेक ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. त्यांत मुख्यतः धर्मदासांद्वारा लिखित कबीर सागर, कबीर बीजक आणि कबीर साखी तसेच संत गरीबदास ह्यांना प्राप्त ज्ञान वर्णित केलेल्या अमर ग्रंथ साहेब ह्यांचा समावेश होतो.

Remove ads

प्रमुख शाखा

सुरुवातीला कबीर पंथाच्या दोन मुख्य शाखा होत्या. पहिल्या शाखेचे केंद्र 'कबीरचौरा' (काशी) आहे. दुसरे मोठे केंद्र छत्तीसगड अंतर्गत येते, ज्याची स्थापना धरमदास यांनी केली होती. वाराणसीमध्ये कबीरदासजी राहत होते त्या जागेला आता कबीरचौरा म्हणतात.

कबीरचौरा शाखा कबीरांचे शिष्य सूरतगोपाल यांनी सुरू केली होती आणि ती सर्वात जुनी मानली जाते. त्याच्या उपशाखा बस्तीच्या मगर, काशीच्या लहरतारा आणि गयाच्या कबीरबागमध्ये आहेत. कबीरचौरामध्ये जगदीशपुरी, हरकेसर मठ, कबीर-निर्णय-मंदिर (बुऱ्हाणपूर) आणि लक्ष्मीपूर मठ यांचा समावेश होतो. छत्तीसगडमध्येही अनेक शाखा आणि उपशाखा आहेत. छत्तीसगड शाखेच्या मांडला, दामाखेडा, छतरपूर इत्यादी ठिकाणी उपशाखा आहेत.

छत्तीसगढ़ी शाखेने कबीरावरील अनेक ग्रंथ आणि रचना तयार करून इतरांपेक्षा वेगळा मार्ग निर्माण केला ज्यामध्ये कबीरांची मूलभूत तत्त्वे गायब असल्याचे सांगितले जाते.

असे मानले जाते की आता कबीर पंथाच्या प्रमुख बारा शाखा आहेत, ज्यांचे संस्थापक नारायणदास, श्रुतिगोपाल साहेब, साहेब दास, कमली, भगवान दास, जगोदास, जगजीवन दास, गरीब दास, तत्वजीव इत्यादी कबीरांचे शिष्य आहेत.

सुरुवातीला कबीर साहेबांचे शिष्य श्रुतिगोपाल साहेब यांनी त्यांच्या जन्मस्थानी वाराणसी येथे मूलगडी या नावाने गडी परंपरा सुरू केली. त्याचाही प्रमुख श्रुतिगोपाल होता. कालांतराने उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान, गुजरात इत्यादी प्रांतात मुळगडीच्या अनेक शाखा स्थापन झाल्या.

कबीरांचा शिष्य 'पद्मनाभ' हा गुजरातमध्ये प्रचलित असलेल्या राम कबीर पंथाचा प्रवर्तक असल्याचे म्हटले जाते आणि तत्वजीव किंवा गणेशदास हे बिहारमधील पाटणा येथील 'फथुहा मठ'चे प्रवर्तक होते, तर कबीर पंथाची बिदूरपूर मठवाली शाखा. मुझफ्फरपूरची स्थापना कबीरांचे शिष्य जगुदास यांनी केली होती. बिहारमधील सारण जिल्ह्यातील धनोटी येथे स्थापन झालेली भगतही शाखा कबीर शिष्य भागोदास यांनी सुरू केली होती.[१२]

Remove ads

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads