कौटिलीय अर्थशास्त्र
From Wikipedia, the free encyclopedia
कौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसऱ्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे.
या ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद आहे.[1] यात लेखकाचे नाव विष्णूगुप्तही असल्याचे लिहिलेले आहे.[2] ही दोन्ही नावे चाणक्याशी निगडीत आहेत.[3] चाणक्य तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होता. नंतर हा चंद्रगुप्त मौर्याचा अमात्य व सल्लागार झाला. कौटिल्यने राज्यसंस्थे बद्द्ल आपले विचार अर्थशास्त्र या ग्रंथात मांडले.या ग्रंथात त्याने राजकारण ,तत्त्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत