देवनागरी
भारताची प्रमुख लिपी / From Wikipedia, the free encyclopedia
देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. मराठी, भोजपुरी, कोकणी, संस्कृत, पाली, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, मैथिली, रोमानी, हिंदी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.[1]