महादेव गोविंद रानडे
भारतीय विद्वान, समाज सुधारक आणि लेखक / From Wikipedia, the free encyclopedia
महादेव गोविंद रानडे (जन्म : १८ जानेवारी १८४२[1]; मृत्यू : १६ जानेवारी १९०१), हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते, तसेच ते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.[2]
महादेव विनायक रानडे याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य महादेव गोविंद रानडे, टोपणनाव: ...
महादेव गोविंद रानडे | |
---|---|
महादेव गोविंद रानडे | |
टोपणनाव: | न्यायमूर्ती रानडे |
जन्म: | १८ जानेवारी १८४2 निफाड, जि - नाशिक, महाराष्ट्र |
मृत्यू: | १६ जानेवारी १९०१ |
चळवळ: | समाजिक सुधारणा |
संघटना: | राष्ट्रीय सामाजिक परीषद (स्थापना - १८८५) |
पत्रकारिता/ लेखन: | सुबोध (पत्रिका) , सुधारक (वृत्तपत्र) |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | महात्मा फुले |
वडील: | गोविंद रानडे |
पत्नी: | रमाबाई रानडे |
बंद करा