जम्मू आणि काश्मीर (राज्य)
भारतातील एक केंद्र शासित प्रदेश. / From Wikipedia, the free encyclopedia
जम्मू आणि काश्मीर [lower-alpha 1] १९५४ पासून २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होते जे भारत, पाकिस्तान आणि चीन मध्ये २० व्या शतकाच्या मध्यापासून काश्मीर प्रदशेवरच्या वादाचा विषय होते.[2][3] या राज्याचा मूळ प्रदेश, ज्याचे पश्चिम जिल्हा, ज्याला आझाद काश्मीर म्हणून ओळखले जाते, आणि उत्तर प्रदेश ज्या आता गिलगिट-बाल्टिस्तान म्हणून ओळखले जातात, हे पाकिस्तानद्वारे प्रशासित आहेत. पूर्वेकडील अक्साई चिन प्रदेश तिबेटच्या सीमेवर १९६२ पासून चीनच्या नियंत्रणाखाली होता.
२०१९ मध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये भारत सरकारने जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यावर, भारतीय संसदेने ३१ ऑक्टोबर २०१९ पासून प्रभावी असलेला जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा मंजूर केला, ज्यात हे राज्य विघटित केले गेले आणि दोन केंद्र शासित प्रदेशात पुनर्रचना केली - पश्चिमेस जम्मू-काश्मीर आणि पूर्वेला लडाख.[4] विघटनानंतर जम्मू-काश्मीर हे मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या असलेले भारतातील एकमेव राज्य होते.