भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. From Wikipedia, the free encyclopedia
हा लेख सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | कोकण विभाग |
मुख्यालय | सिंधुदुर्ग नगरी ओरस |
तालुके | १.सावंतवाडी तालुका, २.कणकवली तालुका, ३ कुडाळ तालुका, ४. देवगड तालुुका ,५. दोडामार्ग तालुका, ६. मालवण तालुका,७. वेंगुर्ला तालुका, ८ वैभववाडी तालुका |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ५,२०७ चौरस किमी (२,०१० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ८,४८,८६८ (२०११) |
-लोकसंख्या घनता | १६३ प्रति चौरस किमी (४२० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | १२.६% |
-साक्षरता दर | ८६.५४% |
-लिंग गुणोत्तर | १.०५ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | श्री.किशोर तावडे |
-लोकसभा मतदारसंघ | रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ) |
-विधानसभा मतदारसंघ | सावंतवाडी • कणकवली • कुडाळ |
-खासदार | विनायक राऊत |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ३,२८७ मिलीमीटर (१२९.४ इंच) |
प्रमुख_शहरे | मालवण, कणकवली |
संकेतस्थळ |
सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते.
पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३८) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.
भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रविड राजास द्वारकेपासून हुलकावणी देत मुचकुंद राजाच्या गुहेत लपून बसले व कालयवनाचा वध झाल्यावर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका आहॆ. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असा निष्कर्ष काढता येतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे येथे भरपूर मासेमारी होते.
प्रमुख मासेमारी बंदरे (८) - आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट
मच्छीमारांची संख्या - २५३६५
मत्स्यॊत्पादन - १९२७३ मेट्रिक टन. .
मच्छीमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)
जिल्ह्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[1]
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तऱ्हेऱ्हेची रानफुले आढळतात. ही फुले म्हणजे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धकांसाठी अमूल्य ठेवा आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावंडे आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित यांनी सिंधुदुर्गातील रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही पुस्तिका तयार केली आहे. तीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळणाऱ्या सुमारे १०० वेलीफुलांची माहिती वाचायला मिळते. ही माहिती त्या फुलांच्या बाह्य स्वरूपाच्या वर्णनाबरोबरच खोड, पाने, पुष्पसंभार, फळे आदी शास्त्रीय तपशिलासह आहे.. पुस्तकात काही वेलीफुलांची रंगीत छायाचित्रे देण्यात आलेली आहेत. तसेच या वेलीफुलांच्या शास्त्रीय नावांप्रमाणेच त्यांची मराठी नावे, फुले-फळे येण्याच्या कालावधीविषयीही माहिती मिळते. मोरवेल, बेंदरीलची वेल, वासन वेल, कांगली, खांड वेल, गोमेटी, शेंगाळो, रवांतो, गारंबी, समुद्र अशोक, गावेल आदी लोकांच्या नेहमीच्या माहितीतल्या, तसेच बऱ्याचशा अज्ञात अशा वैशिष्ट्यपूर्ण वेलीफुलांची माहिती देणारे हे पुस्तक कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.